Friday, 1 July 2016

RBI अहवाल: महाराष्ट्र हे सर्वाधिक श्रीमंत राज्य


#Current_Affairs

🔹RBI अहवाल: महाराष्ट्र हे सर्वाधिक श्रीमंत राज्य

भारतीय रिझर्व्ह बँक ने भारतीय राज्यांवर हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आहे. अहवालानुसार, महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य ठरले असून, 2014-15 मधील त्याचे एकूण राज्य स्थानिक उत्पादन (Gross State Domestic Product -GSDP) हे 9.50 कोटी रुपये पर्यंत होते, जे की 2013-14 च्या तुलनेत 5.7% ने अधिक वाढले आहे.RBI ने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार, 2015-16 मध्ये भारतात तामिळनाडू राज्यात सर्वाधिक एकूण वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला, पंजाब मध्ये सन 2010-11 आणि 2013-14 दरम्यान कारखान्यांची संख्यांमध्ये अखंड घट आढळली आहे.तथापि, GSDP संदर्भात दुसरे श्रीमंत राज्य म्हणजे तामिळनाडू होते. वित्तीय वर्ष 2014-15 साठी तामिळनाडू मधील निव्वळ वित्तीय तूट (gross fiscal deficit) ही 31,830 कोटी रुपये होती, त्यानंतर उत्तर प्रदेश ची 31,560 कोटी अशी होती.

🔹श्री. सुजोय बोस हे NIIF चे नवीन CEO

इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) चे कर्मचारी श्री. सुजोय बोस यांची राष्ट्रीय गुंतवणूक व इन्फ्रास्ट्रक्चर फंड (National Investment and Infrastructure Fund - NIIF) मर्यादित चे CEO म्हणून नियुक्ती झाली आहे. बोस यांना पायाभूत क्षेत्राचा अनुभव आहेया खेरीज, बोस संचालक आणि जागतिक सह-प्रमुख, इन्फ्रास्ट्रक्चर अँड नॅच्युरल रिसोर्सेस, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC), वॉशिंग्टन डी.सी. म्हणून कार्य करीत आहेत.राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF) हा देशातील पायाभूत सुविधांना आर्थिक मदत वाढविण्यासाठी भारतीय केंद्र सरकारद्वारे निर्माण करण्यात आलेला निधी आहे. NIIF हे नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) व इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) सारख्या पायाभूत सुविधा फायनान्स कंपन्यांच्या इक्विटी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.
_____________________________________

No comments:

Post a Comment