Sunday, 19 June 2016

अहवालात भारताचा क्रमांक:-

अहवालात भारताचा क्रमांक:-
------------------------------------------------------------------------

१) उद्योग विकासf  निर्देशांक (जीआरडीआय):-
* जागतिक किरकोळ उद्योग विकास निर्देशांकामध्ये (जीआरडीआय) भारताने 30 विकसनशील देशांच्या यादीत 13 क्रमांकांनी झेप घेत सध्या दुसरे स्थान पटकावले
प्रथम:- चीन
दुसरा:- भारत
तिसरा:- रशिया

२) जागतिक शांतता निर्देशांक:-
पहीला:- आइसलँड
दुसरा:- डेन्मार्क
तिसरा:- ऑस्ट्रिया
१४१ वा:- भारत(२०१५ मध्ये भारताचा क्रमांक १४३ वा होता)

अशांत देश:-
पहिला:- सीरिया
दुसरा:- दक्षिण सुदान,
तिसरा:- इराक

३) जागतिक सामाजिक प्रगती निर्देशांक:-
प्रथम:-नार्वे
दुसरा:- स्वीडन
तिसरा:- स्वीत्झर्लंड
१०१ वा:- भारत

४) वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट :-
( २०१३च्या तुलनेत सहा अंकांनी घसरण)
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- आइसलंड
११७वा:- भारत

५) काळा पैसा देशाबाहेर जाणार्या यादीत:-
प्रथम:- चीन
दुसरा :- रशिया
३ रा:- मलेशिया
४था:- भारत

६)  सयुंक्त राष्ट्र मानव विकास अहवाल -
प्रथम:- नार्वे
२ रा :- ऑस्ट्रेलिया
३ रा:- स्वीत्झर्लंड
१३० वा:- भारत((मागील वर्षी या यादीत भारताचा १३५ वा क्रमांक होता )

७) व्यवसाय सुलभतेमध्ये ( Doing Business ):-
जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार १८९ देशाच्या यादीत भारताचा १३० क्रमांक गतवर्षीच्या तुलनेत भारताने १२ स्थानाची प्रगती
प्रथम:- सिंगापूर
२ रा :- न्युझीलंड
३ रा:- डेन्मार्क
१३० वा:- भारत

८) ब्रॅड फायनान्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मुल्यांकानुसार भारताला जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रॅड म्हणून घोषित करण्यात आले
प्रथम:- अमेरिका
२ रा:- चीन
३ रा:- जर्मनी

९)) भ्रष्टाचार निर्देशांक :-
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या २०१५ मधील अहवालानुसार भारताचा ७६ वा क्रमांक आहे (गतवेळी भारत ८५ व्या क्रमांकावर होता
पहिले ३ देश
पहिला :- डेन्मार्क
२ रा :-फिनलंड
३ रा:- स्वीडन
शेवटचे ३ देश
सोमालिया
उत्तर कोरिया
अफगाणिस्तान
(ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून मे १९९३ मध्ये जर्मनीमध्ये या संस्थेची स्थापना झाली.विविध देशामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे मोजमाप करण्याचे काम ही संस्था करते)

१०) उर्जा सुरक्षा निर्देशांक:-
प्रथम:- स्वीत्झर्लंड
दुसरा:- नार्वे
तिसरा:-स्वीडन
९० वा:- india

eMPSCkatta:
चालू घडामोडी:-
------------------------------------------------------------------------------

आयोग:-
* इम्तियाझ मुर्तझा:-
मथुरेत २ जूनला झालेल्या हिंसाचारात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण मारले गेले होते. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इम्तियाझ मुर्तझा यांच्या अध्यक्षेतेखाली नेमलेली समिती

चर्चित खेळाडू:-
मारिया शारापोवा :-
• टेनिस विश्वा:तील माजी अव्वल मानांकित खेळाडू मारिया शारापोवा हिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने उत्तेजक सेवन प्रकरणात दोन वर्षांची बंदी घातली
• यामुळे पाचवेळची ग्रॅंड स्लॅम विजेती २९ वर्षीय शारापोवा हिची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील कामगिरी पुसली जाईल. तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.ऑस्ट्रेलियन स्पर्धे दरम्यानच आपण उत्तेजक घेतल्याची कबुली तिने दिली होती.
• शारापोवाने बंदीविरुद्ध ल्युसर्न (स्वित्झर्लंड) येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय जाहीर केला.

नरसिंग यादव:-
• रिओ ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटात नरसिंग यादवच भारताचे प्रतिनिधित्व करणार यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
• ऑलिंपिकला जाण्यासाठी चाचणी घेण्याची दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशीलकुमार याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. 
• ऑलिंपिक स्पर्धा ऐन तोंडावर असताना चाचणी घेणे योग्य नाही. त्यामुळे दोन्ही कुस्तीगीर मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यऑता अधिक आहे. तसेच दुखापतीचादेखील धोका आहे, त्यामुळे ऑलिंपिक कोटा मिळणारा नरसिंगच योग्य उमेदवार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
• जागतिक महासंघाकडून वजनी गटात बदल झाल्यावर सुशीलने ७४ किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नरसिंग आधीपासूनच या वजनी गटातून खेळत होता. त्याचबरोबर सुशील या वजनी गटातून फारशा लढती खेळलेला नव्हता. जागतिक स्पर्धेतूनही त्याने माघार घेतली होती. जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवून नरसिंगने देशासाठी ऑलिंपिक कोटा मिळविला. मात्र, त्याचवेळी सुशीलने या वजनी गटातून आपल्याला संधी मिळावी, असा दावा करून चाचणीची मागणी केली होती. महासंघाने मात्र ती फेटाळून लावल्याने सुशील न्यायालयाची पायरी चढला होता.

चर्चित व्यक्ती:-
नीता अंबानी:-
• भारतातील रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) सदस्या म्हणून नामांकन मिळाले
• ‘आयओसी‘वर नामांकन मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. ही निवडणूक रिओ दि जानेरिओ येथे 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘आयओसी‘च्या 129व्या सत्रात होणार आहे
• आयओसी‘वर नव्या नियुक्तीसाठी स्वतंत्र निवड पद्धती अवलंबण्याचा निर्णय झाला असून, त्याच आधारावर अंबानी यांना नामांकन मिळाले आहे.
•अंबानी यांची निवड झाल्यास त्या वयाच्या 70व्या वर्षापर्यंत ‘आयओसी‘च्या सदस्या राहतील.
_______________________________________👍

No comments:

Post a Comment